जिओ कॅप्सूल : ५ मिनटात वाचा ठळक बातम्या थोडक्यात
अर्थसंकल्पातून करण्यात आला नवभारताच्या निर्मितीचा संकल्प : फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प हा अभूतपूर्व आणि ऐतिहासिक असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ‘सबका साथ-सबका विकास’ ही संकल्पना या अर्थसंकल्पामुळे आणखी विस्तारित झाली आहे. नवभारताच्या निर्मितीचा संकल्प सर्वसमावेशक असलेल्या या अर्थसंकल्पातून करण्यात आला असून त्यातून शेतकरी, गरीब, महिला,युवक, मागासवर्गीय आणि ज्येष्ठ नागरिक अशा विविध घटकांना न्याय देण्यात आला आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ________________________ निराशा करणारा अर्थसंकल्प : अशोक चव्हाण केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी लोकसभेत सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे स्वप्नांची मालिका आणि घोषणांचा पाऊस आहे. अशी टीका काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे. अर्थसंकल्पावर बोलताना अशोक चव्हाण यांनी या अर्थसंकल्पामध्ये अंमलबजावणीचा रोडमॅप दिसत नसल्याचे म्हंटले आहे. तसेच मोठमोठे आकडे सांगून प्रत्यक्षात लोकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे ...