१४ डिसेंबरच्या ठळक घडामोडी थोडक्यात
ठाकरे मंत्रिमंडळात 48 तासांत 2 नेत्यांच्या खात्यांत बदल उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर तब्बल 15 दिवसांनी नेत्यांना तात्पुरते खातेवाटप करण्यात आले. खातेवाटप झाल्यानंतर मंत्रिमंडळातील राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांच्याकडील काही खात्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. गुरुवारी संध्याकाळी ठाकरे सरकारचं खातेवाटप घोषित झाल्यानंतर अवघ्या 48 तासांच्या आतंच खातेबदल करण्यात आले आहे. बदललेल्या खात्यानुसार जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास याची जबाबदारी आता जयंत पाटील यांना देण्यात आली आहे. तर अन्न आणि नागरी पुरवठा, अल्पसंख्याक विकास आणि कल्याण ही खाती आता छगन भुजबळ यांच्याकडे देण्यात आली आहेत. म्हणजेच भुजबळ आणि जयंत पाटलांच्या काही खात्यांची अदलाबदल करण्यात आली आहे. खातेबदलाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मान्यता दिली आहे. *************** मरेन पण माफी मागणार नाही – राहूल गांधी “माझे नाव राहुल सावरकर नाही, तर राहुल गांधी आहे,” त्यामुळे मी माफी मागणार नाही,” असे म्हणत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर सडकून टीका केली. नागरिकत्व ...